Sameer Amunekar
बिहारमधील दुर्गावती नदीच्या पूर्व तीरावर वसलेला शेरगड किल्ला तब्बल 400 वर्षांहून अधिक काळ दुर्लक्षित अवस्थेत आहे. याला 'बादल गड' म्हणूनही ओळखले जाते.
रोहतास आणि कैमूर जिल्ह्यांच्या सीमेवरील या नैसर्गिक किल्ल्याभोवती खोल दऱ्या, घनदाट जंगल आणि उंच कडे आहेत. खडकावरील बुरुज आणि तटबंदी त्याचे वैशिष्ट्य आहे.
आज किल्ला अवशेषांत बदलला असला तरी माथ्यावरून दुर्गावती खोरे आणि दूरवरच्या पर्वतरांगांचे नेत्रदीपक दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
कैमूर टेकड्यांवरील शेरगड आणि रोहतासगड हे दोन सर्वात रणनीतिक किल्ले मानले जातात. पश्चिमेकडील संरक्षणासाठी शेरगडचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते.
ब्रिटिश सर्वेक्षक फ्रान्सिस बुकानन यांनी 7 जानेवारी 1813 रोजी शेरगडला भेट देऊन त्याचे पहिले सविस्तर ऐतिहासिक वर्णन नोंदवले.
इतिहासकारांच्या मते, हा किल्ला सुरुवातीला राजपूत शासकांच्या ताब्यात होता. नंतर अफगाण सम्राट शेर शाह सूरने तो आपल्या नियंत्रणाखाली आणला.
इतिहास, वास्तुकला आणि निसर्गाचा अद्वितीय संगम असलेला शेरगड किल्ला आजही योग्य संवर्धन आणि पुरातत्त्वीय उत्खननाच्या प्रतीक्षेत आहे.