Badal Gad Fort: 'बादल गड': 400 वर्षांपासून इतिहासाच्या पाऊलखुणा जपलेला एक दुर्लक्षित किल्ला!

Sameer Amunekar

400 वर्षांपासून दुर्लक्षित किल्ला

बिहारमधील दुर्गावती नदीच्या पूर्व तीरावर वसलेला शेरगड किल्ला तब्बल 400 वर्षांहून अधिक काळ दुर्लक्षित अवस्थेत आहे. याला 'बादल गड' म्हणूनही ओळखले जाते.

Badal Gad Fort | Dainik Gomantak

निसर्गाने सजलेला डोंगरी दुर्ग

रोहतास आणि कैमूर जिल्ह्यांच्या सीमेवरील या नैसर्गिक किल्ल्याभोवती खोल दऱ्या, घनदाट जंगल आणि उंच कडे आहेत. खडकावरील बुरुज आणि तटबंदी त्याचे वैशिष्ट्य आहे.

Badal Gad Fort | Dainik Gomantak

अवशेषांतून दिसते भव्य वैभव

आज किल्ला अवशेषांत बदलला असला तरी माथ्यावरून दुर्गावती खोरे आणि दूरवरच्या पर्वतरांगांचे नेत्रदीपक दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

Badal Gad Fort | Dainik Gomantak

रोहतासगडइतकेच महत्त्वाचे स्थान

कैमूर टेकड्यांवरील शेरगड आणि रोहतासगड हे दोन सर्वात रणनीतिक किल्ले मानले जातात. पश्चिमेकडील संरक्षणासाठी शेरगडचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते.

Badal Gad Fort | Dainik Gomantak

1813 मध्ये झाले पहिले सविस्तर वर्णन

ब्रिटिश सर्वेक्षक फ्रान्सिस बुकानन यांनी 7 जानेवारी 1813 रोजी शेरगडला भेट देऊन त्याचे पहिले सविस्तर ऐतिहासिक वर्णन नोंदवले.

Badal Gad Fort | Dainik Gomantak

शेर शाह सूरशी जोडला इतिहास

इतिहासकारांच्या मते, हा किल्ला सुरुवातीला राजपूत शासकांच्या ताब्यात होता. नंतर अफगाण सम्राट शेर शाह सूरने तो आपल्या नियंत्रणाखाली आणला.

Badal Gad Fort | Dainik Gomantak

संरक्षणाची आजही प्रतीक्षा

इतिहास, वास्तुकला आणि निसर्गाचा अद्वितीय संगम असलेला शेरगड किल्ला आजही योग्य संवर्धन आणि पुरातत्त्वीय उत्खननाच्या प्रतीक्षेत आहे.

Badal Gad Fort | Dainik Gomantak

पावसाळ्यातही मेकअप राहील 'झक्कास'! फॉलो करा 'या' 7 टिप्स

Waterproof Makeup Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा