Sameer Amunekar
स्वच्छ समुद्रकिनारा, लाल माती आणि शांत वातावरण गणपतीपुळे हे कपल्ससाठी परिपूर्ण ठिकाण आहे. संध्याकाळी सूर्यास्त पाहताना समुद्रकिनारी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.
तारकर्ली हे पांढऱ्या वाळूचे स्वर्गीय बीच आहे. जोडीदारासोबत स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग किंवा बोटिंगचा आनंद घ्या. रोमँटिक वॉटर अॅक्टिव्हिटीजसाठी हे ठिकाण खास आहे.
देवगडचा समुद्रकिनारा शांत आणि कमी गर्दीचा आहे. जोडीदारासोबत सायंकाळी बसून समुद्राच्या लाटा पाहणं म्हणजे एक स्वप्नवत क्षण. जवळच असलेला विजयदुर्ग किल्लाही भेट देण्यासारखा आहे.
गुहागर हे स्वच्छ, निसर्गरम्य आणि शांत ठिकाण आहे. शहराच्या गोंधळापासून दूर जाऊन शांत वेळ घालवू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी हे परफेक्ट आहे.
सागरी वाऱ्याचा स्पर्श, नारळाची झाडं आणि निसर्गाचं सौंदर्य. वेंगुर्लेतील सागरकिनारे रोमँटिक मूड तयार करतात. येथे डॉल्फिन पाहण्यासाठी बोट राईडही घेता येते.
जर तुम्हाला डोंगर, धबधबे आणि धुक्याचं वातावरण आवडत असेल तर आंबोलीपेक्षा सुंदर ठिकाण नाही. मॉन्सूनमध्ये तर इथलं सौंदर्य अधिकच खुलतं.