Sameer Amunekar
पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव! धुके, थेंबांचा ताल, हिरवळ आणि मंद वारा… अशा वातावरणात जोडीदारासोबत वेळ घालवण्याची मजा काही औरच. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यात फिरणं स्वर्गासारखं जाणवतं.
धुक्याची चादर, गगनचुंबी डोंगर आणि हिरवाईचा साज येते पाहायला मिळते. लोणावळा पावसात प्रेमाच्या आठवणी कोरण्याचं परिपूर्ण ठिकाण आहे.
जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण असलेलं चेरापूंजी, हे निसर्गप्रेमी जोडप्यांसाठी स्वर्गच! धबधबे, जिवंत रूट ब्रिज आणि दाट जंगलांचं मोहक दृश्य अनुभवताना वेळ कसा जातो कळत नाही.
लोणावळ्याजवळचं मावळ हे पावसात धबधब्यांनी नटलेलं, गर्द हिरवळीत हरवलेलं गाव आहे. किल्ले आणि निसर्गाचा मिलाफ हे ठिकाण जोडप्यांसाठी खास बनवतं.
कॉफीच्या मळ्यांमध्ये हातात हात घालून चालणं, मळे, डोंगररांगा आणि पावसाच्या सरींमध्ये हरवलेलं सौंदर्य… कूर्ग हे थेट प्रेमाच्या कवितेतलं पान वाटतं.
पावसाळ्यातल्या गोव्याचं वेगळंच सौंदर्य असतं. गर्दी कमी, निसर्ग भरात, आणि प्रेमात रमण्यासाठी उत्तम बीच किंवा घाटमाथ्याची ठिकाणं.