Rice Farming: अति पावसामुळे गोव्यातील 'भातशेती' कशी येते संकटात?

गोमन्तक डिजिटल टीम

प्रमुख पीक

तांदूळ हे प्रमुख पीक असल्याने गोव्यात भातशेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. खरीप हंगामातील भातशेती पावसाळ्यात सुरु होते.

Rice Farming

मुसळधार पावसामुळे धोका

लावणीनंतर सतत मुसळधार पाऊस सुरु राहिला तर भातशेतीला धोका निर्माण होतो. शेतकऱ्याच्या मेहनत आणि पैश्यांवर पाणी फिरते.

Rice Farming

कुजण्याची प्रक्रिया

अति पावसामुळे शेतात पाणी भरून राहते. सतत पाणी भरून राहिल्यास रोपे कुजतात.

Rice Farming

पुराचा फटका

मोठा पूर आल्यास वाहून आलेली झाडे, मोठाल्या फांद्या बंधाऱ्यात अडकतात आणि यामुळे आसपासच्या शेतात नदीचे पाणी घुसते.

Rice Farming

खारे पाणी

पावसाच्या काळात भरती तसेच अन्य कारणामुळे खारे पाणी शेतात घुसले आणि साचले की भातशेतीला फटका बसतो तसेच जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो.

Bay

पाण्याच्या अतिरेक

भातशेतीकरता पाणी आवश्यक असतेच पण ते मर्यादेपेक्षा जास्त काळ शेतात राहिले की ते पीकाला नष्ट करते.

Rice Farming

शेतात जाणेही कठीण

पुरामुळे शेतकऱ्यांना शेतात जाताही येत नाही. पुरामुळे गाळ साठला असतो आणि शेत पूर्णपणे चिखलमय झालेले असते.

Rice Farming

चिंतेत भर

ऑगस्ट महिना सुरू झाला आणि मुसळधार पाऊस सुरूच असला की पीक नष्ट होण्याची चिंता असते. असे संकट उद्भवले की शेतकऱ्यांना सरकारी मदतीवर अवलंबून राहावे लागते.

Rice Farming

निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा गोव्यातील एक 'खास' उत्सव

Goan Festival
आणखी पाहा