Ashutosh Masgaunde
तेलंगणामध्ये काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
2013 मध्ये काँग्रेसनेच तेलंगणा राज्याची स्थापना केली होती. त्यानंतर पक्षाला प्रथमच सरकार स्थापन करण्यात यश आले.
तेलंगणाचे राज्यपाल टी सुंदरराजन यांनी हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित एका उपमुख्यमंत्रीभव्य कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
रेवंत रेड्डी यांच्याशिवाय आणखी 10 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी भट्टी विक्रमार्क यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.
पीएम मोदींनी ट्विट करून रेवंत रेड्डी यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने 90 पैकी 66 जागा जिंकत बहुमत मिळवले. तर सतत्ताधारी बीआरएसला 39 जागा मिळाल्या.
या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.