Manish Jadhav
नातेसंबंध मजबूत आणि आनंददायी ठेवणे हे प्रत्येक जोडप्यासाठी महत्त्वाचे असते. मात्र, अनेकदा काही कारणांमुळे नात्यात तणाव निर्माण होतो आणि हळूहळू दुरावा वाढतो. ही दुराव्याची कारणे ओळखून त्यावर लवकर उपाय केले तर नाते वाचवणे आणि अधिक मजबूत करणे शक्य होते.
स्पष्ट आणि खुला संवाद नसल्याने गैरसमज वाढतात. भावना दडपून ठेवण्यामुळे तणाव वाढतो.
खोटे बोलणे किंवा गोष्टी लपवणे, यामुळे जोडीदारावरील विश्वास कमी होऊ लागतो.
नातेसंबंध टिकवण्यासाठी वेळ देणे आवश्यक असते. करिअर, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींमध्ये जास्त व्यस्त राहिल्यास दुरावा वाढतो.
आपली चूक मान्य न करणे. तसेच, जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे हे देखील नात्यामध्ये दुरावा येण्याचे कारण ठरते.
जवळीक कमी झाल्यास भावनिक आणि शारीरिक दुरावा वाढतो.
इतर लोकांच्या हस्तक्षेपामुळे निर्णय घेण्यास अडचण येते. जोडीदाराच्या मताला कमी महत्त्व दिल्यास नाराजी निर्माण होते.
पैशांबाबत मतभेद असल्यास नात्यात तणाव निर्माण होतो. खर्च करण्याच्या सवयी जुळत नसल्यास संघर्ष वाढतो.