Rajgad Fort: महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी घालते साद; शिवप्रेमींचा आवडता 'राजगड किल्ला'

Manish Jadhav

राजगड

राजगड हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. हाच किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होता.

Rajgad Fort | Dainik Gomantak

किल्ला कुठे आहे?

हा किल्ला पुणे जिल्ह्यात असून भोरच्या वायव्येला 24 कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात आहे.

Rajgad Fort | Dainik Gomantak

स्वराज्याची पहिली राजधानी

राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होता. राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादा डोंगर किंवा नदी ओलांडावीच लागते. राजगडाचे मोक्याचे स्थान लक्षात घेता महाराजांनी राजकीय केंद्र म्हणून राजगडाची निवड केली होती.

Rajgad Fort | Dainik Gomantak

पहिले शतक

राजगड किल्ला हा इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. 

Rajgad Fort | Dainik Gomantak

शाहिस्तखानाची स्वारी

जेव्हा शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याने राजगडाकडे फौज पाठवून जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली होती.

Rajgad Fort | Dainik Gomantak

महाराजांनी खोड मोडली

मात्र, 6 एप्रिल1663 रोजी स्वराज्यावर चालून आलेल्या शाहिस्तेखानाची खोड मोडून महाराज राजगडावर परतले होते. 

Rajgad Fort | Dainik Gomantak

थेट राजगडावर पोहोचले

तसेच, 12 सप्टेंबर 1666 मध्ये जेव्हा औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन परतले तेव्हा ते थेट राजगडावर पोहोचले होते.

Rajgad Fort | Dainik Gomantak

पाऊलवाटा

राजगडावर जाण्यासाठी चोहोबाजूंनी पाऊलवाटा आहेत. वेळवंड, मळे, भूतुंडे, पाल खुर्द, वाजेघर, गुंजवणे, फणसी, या मार्गाने गडावर जाता येते.

Rajgad Fort | Dainik Gomantak

New Electric Scooter: अफलातून फीचर्स अन् दमदार मायलेज! ईवा इलेक्ट्रिक स्कूटरचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च

आणखी बघा