Manish Jadhav
राजगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेला आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा डोंगरी किल्ला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये हा किल्ला ताब्यात घेऊन त्याचे नाव 'राजगड' ठेवले. तब्बल 26 वर्षे (1672 पर्यंत) हा किल्ला मराठा स्वराज्याची पहिली राजधानी होता.
राजगडाच्या बांधणीपूर्वी हा डोंगर 'मुरंबदेवाचा डोंगर' म्हणून ओळखला जात होता. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची अभेद्यता आणि भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे पुनर्रचना केली.
राजगडाची रचना खूप खास आहे. या किल्ल्याला एक उंच बालेकिल्ला आणि संरक्षणासाठी पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची अशा तीन प्रमुख माच्या (संरक्षक तटबंदी) आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम यांचा जन्म याच किल्ल्यावर 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला होता. यामुळे किल्ल्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
1665 मध्ये जयसिंगासोबत झालेल्या पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांना २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले होते, पण राजगड आपल्या ताब्यात ठेवण्यात महाराजांना यश आले होते.
या तीन माच्यांपैकी संजीवनी माचीची तटबंदी सर्वात मोठी (अंदाजे २.५ किमी लांब) आहे. ही तटबंदी खोल दऱ्यांमध्ये उतरलेली असल्यामुळे तिचे संरक्षण करणे खूप कठीण होते.