Manish Jadhav
मेहरानगढ किल्ल्याची स्थापना 1459 मध्ये मारवाडचे शासक राव जोधा यांनी केली. त्यांनी आपली राजधानी मंडोरवरुन येथे हलवली आणि एका उंच टेकडीवर या विशाल किल्ल्याची पायाभरणी केली.
हा किल्ला ज्या टेकडीवर आहे, तिला 'चिरीयाटंक' (पक्ष्यांची टेकडी) म्हटले जायचे. तिथे राहणाऱ्या 'चिरीयानाथ' नावाच्या साधूला तिथून हटवण्यात आल्यामुळे त्यांनी किल्ल्याला 'पाण्यासाठी तरसाल' असा शाप दिला होता, ज्याचा प्रभाव आजही जाणवतो.
साधूचा शाप निकामी करण्यासाठी आणि किल्ल्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी एका मानवी बलिदानाची गरज होती. त्यावेळी राजा राम मेघवाल नावाच्या व्यक्तीने स्वतःहून स्वेच्छेने किल्ल्याच्या पायात जिवंत गाडले जाण्याचे सर्वोच्च बलिदान दिले.
'मेहरानगढ' हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे. 'मेहर' म्हणजे सूर्य आणि 'गढ' म्हणजे किल्ला. जोधपूरचे राठोड घराणे स्वतःला सूर्यवंशी मानत असल्यामुळे त्यांनी या किल्ल्याचे नाव सूर्याच्या नावावरुन 'मेहरानगढ' असे ठेवले.
हा किल्ला जमिनीपासून तब्बल 410 फूट उंच टेकडीवर वसलेला आहे. याच्या भिंती इतक्या अवाढव्य आणि मजबूत आहेत की, अनेक आक्रमणे होऊनही हा किल्ला कधीही शत्रूला जिंकता आला नाही.
किल्ल्याला एकूण 7 दरवाजे (पोल) आहेत. त्यापैकी 'जय पोल' हा दरवाजा 1808 मध्ये जयपूरच्या सैन्याविरुद्ध मिळालेल्या विजयाच्या प्रीत्यर्थ बांधला गेला. या भिंतींवर आजही तोफेच्या गोळ्यांचे डाग इतिहासाची साक्ष देतात.
किल्ल्याच्या 'लोहा पोल' दरवाजावर मारवाडच्या राण्यांच्या हाताचे 31 ठसे कोरलेले आहेत. 1843 मध्ये महाराजा मानसिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या राण्यांनी सती जाण्यापूर्वी हे हाताचे ठसे तिथे उमटवले होते.