Manish Jadhav
मध्यप्रदेशातील ऐतिहासिक आणि गौरवशाली रायसेन किल्ल्याचा इतिहासकाळ अत्यंत रंजक, पराक्रमी आणि तितकाच थरारक राहिलेला आहे.
या ऐतिहासिक किल्ल्याचा इतिहास साधारणपणे 10व्या शतकापासून सुरु होतो. चंदेल आणि परमार राजांच्या काळात या किल्ल्याची पायाभरणी झाली. बलुआ (वाळूचा) दगडावर बांधलेला हा विशाल किल्ला त्या काळी मध्य भारताचे एक प्रमुख राजकीय केंद्र मानला जात असे.
रायसेन किल्ल्याने इतिहासकाळात तब्बल 14 मोठी युद्धे आणि आक्रमणे अनुभवली आहेत. या किल्ल्याची तटबंदी आणि भौगोलिक रचना इतकी मजबूत होती की, शेकडो सैन्याला घेऊन आलेले अनेक परकीय आक्रमक अनेक महिने वेढा घालूनही हा किल्ला सहज जिंकू शकले नाहीत.
इतिहासातील सर्वात मोठे युद्ध 1543 मध्ये घडले. अफगाण शासक शेरशाह सुरीने या किल्ल्याला वेढा घातला होता. कित्येक महिने प्रयत्न करुनही अपयश आल्यावर, शेरशाहने कुराणाची खोटी शपथ घेऊन राजा पूरणमल यांच्याशी शांतता कराराचे ढोंग केले आणि रात्रीच्या अंधारात फसवणूक करुन हल्ला केला.
शेरशाह सुरीने केलेल्या फसवणुकीनंतर, किल्ल्यावरील राजपूत महिलांनी परकीय आक्रमकांच्या हाती पडण्याऐवजी आपल्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी 'जौहर' पत्करले. राजा पूरणमल यांनी स्वतः आपल्या हाताने राणी रत्नावलीचे मस्तक धडावेगळे केले.
शेरशाह सुरीच्या आधी, मुघल सम्राट हुमायूंने देखील या किल्ल्याचे महत्त्व ओळखून यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. माळवा प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला ताब्यात असणे मुघल, अफगाण आणि राजपूत या तिन्ही सत्तांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाई.
पुढील काळात या किल्ल्यावर गोंड राजा निजाम शाह यांचे नियंत्रण होते. त्यांच्या मृत्यूनंतर राणी कमळापतीने भोपाळच्या नवाबांची मदत घेतली. त्यानंतरच्या कालखंडात हा किल्ला भोपाळ संस्थानाचा एक भाग बनला.