Manish Jadhav
असीरगड किल्ल्याला 'दक्षिणचे प्रवेशद्वार' किंवा 'दख्खनची गुरुकिल्ली' म्हटले जायचे. ज्याचे या किल्ल्यावर नियंत्रण, त्याचे संपूर्ण दक्षिण भारतावर वर्चस्व प्रस्थापित होत असे.
सातपुडा पर्वत रांगांवर, समुद्रसपाटीपासून सुमारे 2592 फूट उंचावर वसलेला हा किल्ला त्याच्या भौगोलिक रचनेमुळे शत्रूसाठी पूर्णपणे अभेद्य आणि जिंकण्यास कठीण होता.
या किल्ल्याची निर्मिती 14व्या शतकाच्या सुरुवातीला 'आसा अहीर' नावाच्या एका मेंढपाळ राजाने केली होती. त्याच्याच नावावरुन या किल्ल्याला 'असीरगड' हे नाव मिळाले.
मुघल सम्राट अकबराच्या आयुष्यातील ही शेवटची लष्करी मोहीम होती. 1601 मध्ये अकबराने हा किल्ला जिंकण्यासाठी जंगजंग पछाडले होते आणि शेवटी लाच देऊन फितुरीने हा किल्ला ताब्यात घेतला.
अकबरालाही हा किल्ला युद्धाने जिंकता आला नाही, अशी इतिहासात नोंद आहे. त्याने किल्ल्याचे दरवाजे उघडण्यासाठी 'सोन्याच्या चाव्यांचा' वापर केला होता, अशी कथा प्रसिद्ध आहे.
या किल्ल्यात एक प्राचीन शिवमंदिर आहे. स्थानिक मान्यतेनुसार, महाभारतातील अमर पात्र 'अश्वत्थामा' आजही दररोज पहाटे या मंदिरात येऊन भगवान शिवाची पूजा करतो आणि गुलाबाचे फूल वाहतो.
उत्तर काळात या किल्ल्यावर मराठ्यांचे वर्चस्व होते. मात्र, 1899 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव करुन या धोरणात्मक किल्ल्यावर आपले नियंत्रण मिळवले.