Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची भौगोलिक तटबंदी पाहून 1670 च्या दशकात या गडाला स्वराज्याची अधिकृत राजधानी बनवले.
6 जून 1674 रोजी याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सार्वभौम 'शिवराज्याभिषेक' सोहळा संपन्न झाला आणि हिंदवी स्वराज्य साकारले.
महाराजांचे मुख्य शिल्पकार 'हिरोजी इंदुलकर' यांनी रायगडवर भव्य राजवाडा, बाजारपेठ, आणि विस्तीर्ण इमारतींची अभूतपूर्व रचना केली.
आपल्या बाळासाठी रात्रीच्या अंधारात गडाचा उभा कडा उतरुन जाणाऱ्या 'हिरकणी'च्या असीम मातृत्वाची साक्ष हा किल्ला देतो.
3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडवरच अंतिम श्वास घेतला. गडावर असलेली त्यांची समाधी आजही कोट्यवधींचे प्रेरणास्थान आहे.
शिवरायांच्या निधनानंतर 1689 मध्ये औरंगजेबाचा सरदार झुल्फिकार खान याने रायगडला वेढा घातला, ज्याला मराठ्यांनी कडाडून विरोध केला.
उत्तरकाळात हा किल्ला पेशव्यांच्या नियंत्रणात होता; मात्र मे 1818 मध्ये ब्रिटिश कर्नल प्रॉथरने केलेल्या तोफमारीत गडावरील अनेक वास्तू जळून खाक झाल्या.
आजही गडावरील महादरवाजा, टकमक टोक, जगदीश्वर मंदिर आणि भव्य राजदरबार मराठा साम्राज्याच्या सुवर्णकाळाची भव्यता दाखवून देतात.