Akshata Chhatre
फसवेगिरी करणारी लोकं त्यांच्याच मतांवर जोर देतात आणि इतरांकडे दुर्लक्ष करतात. ते अशा प्रकारे बोलतात की दुसऱ्याला बोलण्याची संधी मिळत नाही.
असे लोक आपल्या चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देतात. ते कधीही स्वतःच्या चुकांना मान्य करत नाहीत.
ते भावनांना शस्त्र म्हणून वापरतात. ते रडतात, धमक्या देतात किंवा अपराधी वाटण्याची भावना निर्माण करतात जेणेकरून दुसरे त्यांच्या इच्छेनुसार वागतील.
अशी माणसं स्वतःचेच शब्द फिरवतात आणि समोरच्याला संभ्रमात टाकतात.
ते आपल्या क्षमतांवर शंका घेतात आणि आपल्याला पटवून देतात की आपण काहीच करू शकत नाही.
तुम्ही अशा माणसाच्या संपर्कात असाल तर वेळीच सावध व्हा.