Manish Jadhav
थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे 41 मोठ्या लढाया लढल्या आणि विशेष म्हणजे ते एकाही लढाईत पराभूत झाले नाहीत.
हैदराबादच्या निझाम-उल-मुल्कला बाजीरावांनी ज्या पद्धतीने घेरले, ती रणनीती आजही जगभरातील लष्करी अभ्यासात 'मोबिलिटी' (वेग) आणि 'गनिमी कावा' याचे सर्वोत्तम उदाहरण मानली जाते.
बाजीरावांनी मुघलांच्या ताब्यात असलेला माळवा प्रदेश जिंकून मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तरेकडे मोठ्या जोमाने सुरु केला.
महाराजा छत्रसाल यांना मुहम्मद खान बंगशच्या तावडीतून वाचवण्यासाठी बाजीरावांनी प्रचंड वेगाने कूच केली आणि बंगशचा पराभव करुन मराठ्यांचा दरारा निर्माण केला.
बाजीरावांनी केवळ 500 घोडेस्वारांसह अवघ्या 10 दिवसांचे अंतर 48 तासांत कापून दिल्लीच्या वेशीवर धडक दिली होती, ज्यामुळे मुघल सम्राट मोहम्मद शाह लाल किल्ल्यात लपून बसला होता.
निझाम आणि मुघलांच्या संयुक्त सैन्याचा बाजीरावांनी भोपाळमध्ये पराभव केला. या युद्धानंतर 'दोरहा सराय'चा तह होऊन मुघलांनी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले.
बाजीरावांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव करुन वसईचा किल्ला जिंकला, हा मराठ्यांचा परकीय सत्तेवरील मोठा विजय होता.
बाजीरावांच्या यशाचे मुख्य रहस्य त्यांच्या घोडदळाचा वेग आणि शत्रूला रसद न मिळू देण्याची रणनीती (Scorched Earth Policy) हे होते.