Manish Jadhav
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वसलेला 'पेमगिरी' (भीमगड उर्फ शाहगड) हा किल्ला यादवकालीन स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी याच किल्ल्यावरुन स्वराज्य निर्मितीचा पहिला धाडसी प्रयत्न केला होता.
1633 ते 1636 या काळात शहाजीराजांनी मुर्तजा निजामशाह याला गादीवर बसवून याच शाहगडावरून स्वतंत्र कारभार सुरु केला होता.
या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विस्तीर्ण पठार. किल्ल्यावर चढताना निसर्गाचे विलोभनीय रुप आणि सह्याद्रीच्या रांगांचे दर्शन घडते.
किल्ल्याच्या पायथ्याशी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि पुरातन वडाचे झाड आहे, जे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.
किल्ल्यावर आजही यादवकालीन पाण्याची टाकी, तटबंदीचे अवशेष आणि जुन्या वाड्यांचे जोते पाहायला मिळतात, जे इतिहासाची साक्ष देतात.
शहाजीराजांनी काही काळ शाहगडला आपली राजधानी केले होते, ज्यामुळे या किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.
इतिहास आणि निसर्ग यांचा संगम असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी संगमनेरवरून सहज पोहोचता येते, हा ट्रेकर्ससाठी एक उत्तम अनुभव ठरतो.