Manish Jadhav
पद्मदुर्ग हा रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यातील कासा बेटावर असलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि सागरी संरक्षणासाठी बांधला.
या किल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट जंजिऱ्याच्या सिद्दीला शह देणे आणि त्याला समुद्रातून होणाऱ्या हल्ल्यांपासून रोखणे हे होते.
शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1674 च्या सुमारास बांधला. हा किल्ला त्यांच्या दूरदृष्टीचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
कमळाच्या फुलासारखा सुंदर आणि महत्त्वाचा असल्यामुळे महाराजांनी या किल्ल्याला 'पद्मदुर्ग' असे नाव दिले.
"पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली आहे," असे शिवाजी महाराजांनी या किल्ल्याबद्दल म्हटले होते, ज्यामुळे त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते.
हा किल्ला आजही मजबूत स्थितीत असून, महाराजांच्या सागरी आरमाराची ताकद आणि त्यांच्या संरक्षणाची दूरदृष्टी दर्शवतो.
पद्मदुर्ग किल्ला आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग असून, तो पाहण्यासाठी मोठ्यासंख्येने पर्यटक इथे येतात.