Pramod Yadav
दक्षिण जिल्ह्यात असणारा बेतुल किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला हा एकमेव किल्ला आहे.
मडगाव (Margao) पासून 20 ते 22 किमी अंतरावर असणारा हा किल्ला 1679 मध्ये बेतुलच्या हवालदारांनी महाराजांच्या आदेशावरुन हा किल्ला बांधला होता.
पोर्तुगीजांच्या अर्कायजन अर्कोलॉजीमध्ये याबाबत पुरावा आढळतो. पोर्तुगीज कमांडर आणि बेतुलच्या हवालदार यांच्यातील एक पत्रव्यवहार आहे.
पोर्तुगीज कमांडरने बेतुलच्या हवालदारांना किल्ला बांधू नका अन्यथा आक्रमण करु असा इशारा दिला होता.
त्यावर बेतुलचा हवालदार म्हणाला होता "तुम्हाला काय करायचंय ते करा, ही भूमी आमची आहे, तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही!" असा उल्लेख या पत्रात आढळतो.
बेतुल हा किल्ला (Betul Fort) दक्षिण गोव्यातील साळ नदीच्या मुखदर्शनी असून, येथून जवळच साष्टी नावाचा एक श्रीमंत प्रांत होता. आजही साष्टी (Salcete) तालुका म्हणूनच ओळखला जातो.
महाराजांनंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला, आणि पोर्तुगीजांनी त्याचं रुपांतर कस्टम हाऊसमध्ये केले.
किल्ल्याच्या रक्षणासाठी किल्ल्यावर एक लाँग रेंज तोफ आहे. किल्लावर एक पोर्तुगीज भाषेतील शिलालेख देखील आहे.
महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणाऱ्या गोव्यातील या एकमेव किल्ल्याचे आता भग्नावशेष शिल्लक आहेत.