Akshata Chhatre
लग्न हे नातं फक्त दोन व्यक्तींचं एकत्र येणं नाही, तर विश्वास, प्रेम आणि परस्पर आदरावर उभं राहिलेलं एक आयुष्यभराचं बंधन आहे.
नवरा-बायको एकमेकांसाठी खूप काही करतात, पण कधी कधी छोट्या-छोट्या वादातून मोठ्या गैरसमजांना सुरुवात होते.
विशेषतः नवरा रागाच्या भरात जिव्हारी लागतील अशा गोष्टी बोलून जातो आणि बायको मात्र आतून दुखावली जाते.
सर्वात सामान्य चूक म्हणजे तुलना. अनेकदा पती आपल्या पत्नीची तुलना आईशी करतात “आईने केलेला स्वयंपाक जास्त चविष्ट असतो” असे बोलून ते नकळत पत्नीचा अपमान करतात.
पत्नी ही स्पर्धक नाही, ती तुमच्या आयुष्यातील साथीदार आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
पत्नीच्या शरीरावर किंवा दिसण्यावर केलेल्या टिप्पणी तिचं मन तोडतात. प्रेमात रंग, रूप, शरीरयष्टी महत्त्वाची नसते; मग आपल्या जोडीदाराला दुखावणारे शब्द का वापरायचे?
पत्नी तिच्या भावना व्यक्त करत असताना किंवा तक्रार मांडताना तिला “तू ओव्हररिअॅक्ट करतेयस” असं म्हणणं टाळा. तिचं ऐकून घ्या, तिच्या मनाला महत्त्व द्या.
नातं टिकवायचं असेल तर बरोबर किंवा चूक यावर न रेंगाळता परस्परांबद्दल सहानुभूती, समजूतदारपणा आणि आदर ठेवा. शेवटी, प्रेम हीच खरी ताकद आहे जी नात्याला घट्ट बांधून ठेवते.