Sameer Amunekar
कोथिंबीरमध्ये शरीरातील घातक विषारी घटक बाहेर टाकण्याची क्षमता असते. याचा रस बनवून दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास रक्त शुद्धीमध्ये मदत होते.
गव्हाच्या तुरात क्लोरोफिल, अँटीऑक्सिडंट्स आणि आयर्न भरपूर असते. हे रक्तातील टॉक्सिन्स दूर करतं आणि हिमोग्लोबिन वाढवतं.
बीटमध्ये आयर्न आणि नायट्रेट्स अधिक प्रमाणात असतात. हे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातून हानिकारक पदार्थ बाहेर टाकते.
आवळा हा व्हिटॅमिन C ने भरलेला सुपरफूड आहे. तो लिव्हर आणि किडनीचं काम सुधारतो आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो.
तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. रोज सकाळी एक कप तुळशीचा काढा घेतल्यास रक्त शुद्ध होतं.
हळद ही नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. रात्री झोपण्याआधी हळदीचं दूध घेतल्यास शरीरात साचलेली विषारी द्रव्यं बाहेर पडतात.
लिंबामध्ये सिट्रिक अॅसिड असून ते शरीर डिटॉक्स करतं. मधासोबत घेतल्यास हे मिश्रण शरीर शुद्ध करतं आणि पचन सुधारतं.