Nahargarh Fort: भटकणारा आत्मा अन् राजाचा तांत्रिक तोडगा, पर्यटकांना चक्रावून टाकणारे छुपे रस्ते; सह्याद्रीच्या वाघांसाठी राजस्थानात उभारला 'नहरगड'

Sameer Amunekar

नहरगड किल्ला

नहरगड किल्ल्याची निर्मिती 1734 मध्ये महाराज सवाई जयसिंग (दुसरे) यांनी केली. जयपूर शहराच्या संरक्षणासाठी आमेर किल्ला, जयगड किल्ला आणि नहरगड किल्ला अशी त्रिसुत्री तयार करण्यात आली होती, ज्यातील नहरगड हा मुख्य सुरक्षा कडा होता.

Nahargarh Fort | Dainik Gomantak

'सुदर्शनगड' ते 'नहरगड'

या किल्ल्याचे मूळ नाव 'सुदर्शनगड' असे ठेवण्यात आले होते. परंतु, ज्या टेकडीवर हा किल्ला बांधला गेला, तिथे 'नहर सिंग भोमिया' नावाच्या एका राजपूत राजपुत्राचा आत्मा भटकत होता, अशी लोककथा आहे. त्यांच्या नावावरुन पुढे याचे नाव 'नहरगड' (वाघांचे निवासस्थान) पडले.

Nahargarh Fort | Dainik Gomantak

किल्ल्याचा इतिहास

असे म्हटले जाते की, किल्ल्याच्या बांधकामादरम्यान, दिवसा जेवढे बांधकाम व्हायचे, ते रात्री आपोआप कोसळायचे. तांत्रिकांच्या सल्ल्यानुसार, महाराज जयसिंग यांनी त्या जागेवर राहणाऱ्या नहर सिंग यांच्या आत्म्यासाठी किल्ल्याच्या आत एक छोटे मंदिर बांधले आणि किल्ल्याचे नाव त्यांच्या नावावर केले; त्यानंतरच बांधकाम पूर्ण होऊ शकले.

Nahargarh Fort

मराठ्यांचे आक्रमण

महाराज सवाई जयसिंग यांनी या किल्ल्याची निर्मिती प्रामुख्याने मराठा सैन्याच्या संभाव्य आक्रमणांना तोंड देण्यासाठी आणि जयपूर शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी एक लष्करी तळ म्हणून केली होती.

Nahargarh Fort | Dainik Gomantak

9 राण्यांसाठी 9 एकसारखे महाल

किल्ल्याच्या आत 'माधवेंद्र भवन' नावाचा एक अत्यंत सुंदर महाल आहे. महाराज सवाई माधवसिंग (दुसरे) यांनी त्यांच्या 9 लाडक्या राण्यांसाठी 9 हुबेहूब आणि एकसारखे दुमजली महाल बांधले होते.

Nahargarh Fort | Dainik Gomantak

कधीही थेट हल्ला न झालेला किल्ला

नहरगड किल्ल्याचा इतिहास असा आहे की, त्याच्या संपूर्ण कार्यकाळात या किल्ल्यावर कधीही कोणताही थेट लष्करी हल्ला झाला नाही. मात्र, 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान, जयपूरच्या राजाने अनेक युरोपीय आणि ब्रिटिश नागरिकांच्या संरक्षणासाठी त्यांना या किल्ल्यात आश्रय दिला होता.

Nahargarh Fort | Dainik Gomantak

'वाटर हार्वेस्टिंग' यंत्रणा

नहरगड किल्ल्यामध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी इतिहासकालीन अतिशय प्रगत अशी 'वॉटर हार्वेस्टिंग' (जलसंधारण) यंत्रणा आहे. किल्ल्याच्या चहुबाजूंनी असलेल्या टेकड्यांवरुन पाणी गोळा करुन ते मोठ्या दगडी टाक्यांमध्ये साठवले जायचे, ज्यामुळे तीव्र उन्हाळ्यातही किल्ल्यात पाण्याची कमतरता भासत नसे.

Nahargarh Fort | Dainik Gomantak

Lakhpat Fort: 15 हजारांची वस्ती थेट 'Ghost Town' बनली! नदीने सोडली साथ अन् व्यापारी झाले कंगाल; अब्जाधीशांच्या लखपत किल्ल्याची थरारक कहाणी

आणखी बघा