Manish Jadhav
18व्या शतकात या समृद्ध बंदरातून दररोज 1 लाख 'कोरी' चलनाची महसूल म्हणून कमाई होत असे, म्हणूनच याला 'लखपत' नाव पडले.
या किल्ल्याच्या भक्कम बांधणीमुळे कोणत्याही परकीय आक्रमकाला किंवा राजाला हा किल्ला कधीही युद्ध करुन जिंकता आला नाही.
सिंध प्रांतातील शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी जमादार फतेह मोहम्मद यांनी या किल्ल्याभोवती 24 बुरुजांची 7 किलोमीटर लांब भिंत बांधली.
1819 मधील भीषण भूकंपामुळे जमिनीचा भाग उंचावला आणि सिंधू नदीने प्रवाह बदलल्याने हे समृद्ध बंदर एका रात्रीत उद्ध्वस्त झाले.
व्यापार पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे 15 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले हे शहर हळूहळू रिकामे झाले आणि आज तिथे मोजकीच कुटुंबे राहतात.
मक्का-मदीना यात्रेला जाताना गुरु नानक देव येथे राहिले होते; त्यांच्या स्मृत्यर्थ येथे ऐतिहासिक 'गुरुद्वारा लखपत साहिब' उभारण्यात आले.
किल्ल्याच्या आत हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मात पूजले जाणारे सुफी संत पीर घौस मोहम्मद यांचा भव्य काळ्या दगडातील कोरीव मकबरा आहे.