Sameer Amunekar
पावसात भिजल्यानंतर लगेच शरीर स्वच्छ पुसून कोरडे करा. ओलसर त्वचेमुळे बुरशी आणि खाज वाढू शकते.
खूप गरम पाणी टाळा. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो आणि खाज कमी होते.
अंघोळीनंतर शुद्ध नारळाचे तेल लावल्याने त्वचा मॉइश्चराइज राहते आणि खाज व कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
ताज्या अॅलोवेरा जेलमुळे त्वचेला थंडावा मिळतो. जळजळ, लालसरपणा आणि खाज कमी होण्यास मदत होते.
घट्ट किंवा सिंथेटिक कपड्यांमुळे घाम अडकतो. सुती कपडे घातल्यास त्वचेला हवा मिळते आणि खाज कमी होते.
शरीर हायड्रेट ठेवल्यास त्वचा निरोगी राहते. दिवसातून पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा.
खाज अनेक दिवस कायम राहणे, पुरळ, पाणी येणे किंवा सूज दिसल्यास हे बुरशीजन्य किंवा त्वचारोगाचे लक्षण असू शकते. अशावेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.