Sameer Amunekar
पावसाळ्यात जलजन्य आजारांचा (Waterborne Diseases) धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे पाणी नेहमी चांगल्या प्रकारे उकळून आणि गाळूनच प्या.
या दिवसांत हवेतील आर्द्रतेमुळे जीवाणूंची (Bacteria) वाढ झपाट्याने होते. त्यामुळे बाहेरचे, उघड्यावरील किंवा तळलेले अन्न खाणे टाळा आणि घरी बनवलेले ताजे अन्न खा.
बाहेरून आल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा. पावसाच्या पाण्यात भिजल्यास लगेच अंघोळ करा आणि शरीर पूर्णपणे कोरडे करा, जेणेकरून फंगल इन्फेक्शन होणार नाही.
आजारांशी लढण्यासाठी आहारात आल्याचा चहा, हळदीचे दूध, लिंबू, आणि व्हिटॅमिन-सी युक्त फळांचा समावेश करा. यामुळे तुमची इम्युनिटी मजबूत राहा.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा त्रास वाढतो. घराभोवती पाणी साचू देऊ नका, मॉस्किटो रिपेलेंट वापरा आणि झोपताना डासदाणीचा वापर करा.
दमट वातावरणामुळे कपडे आणि शूज लवकर सुकत नाहीत. दमट किंवा थोडेही ओले असलेले कपडे घातल्याने त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकते, त्यामुळे पूर्ण सुकलेले कपडेच वापरा.
पावसाळ्यात पालेभाज्यांवर कीटक आणि बॅक्टेरिया असण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच पालेभाज्या वापरण्यापूर्वी त्या कोमट पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्या.