Sameer Amunekar
पावसात भिजून घरी आल्यावर लगेच कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि जंतूंचा संसर्ग टाळण्यास मदत होते.
पावसात भिजल्यावर डोक्याचे केस ओले राहिल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे भिजल्यावर लगेच टॉवेलने केस नीट कोरडे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भिजल्यानंतर आले, तुळस, मिरी आणि दालचिनी घालून तयार केलेला गरमागरम काढा किंवा हर्बल टी प्या. हे तुमच्या शरीराला उबदार ठेवेल आणि प्रतिकारशक्ती वाढवेल.
भिजलेले कपडे शरीरावर जास्त वेळ ठेवू नका. ते त्वरित बदलून सुती आणि कोरडे कपडे घाला, जेणेकरून त्वचेचे इन्फेक्शन किंवा थंडी लागण्यापासून बचाव होईल.
पावसात भिजताना रस्त्यावरील साचलेले पाणी अंगावर उडते, ज्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. घरी आल्यावर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवा.
पावसाळ्यात आजारपणाला लांब ठेवण्यासाठी आहारात लिंबू, संत्री, आवळा यांसारख्या व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचा समावेश करा. हे नैसर्गिकरित्या तुमची इम्युनिटी वाढवतात.
पावसात भिजून आल्यानंतर थोडा वेळ उबदार कपडे घालून आराम करा. शरीर पुन्हा नॉर्मल तापमानाला येण्यासाठी पुरेसा विश्रांती घेणे आवश्यक आहे.