Sameer Amunekar
कुंडीतील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत आहे की नाही, हे तपासा. कुंडीच्या तळाशी असलेले ड्रेनेज होल मोकळे असल्याची खात्री करा, जेणेकरून अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही.
पावसाळ्यात दररोज पाणी देऊ नका. कुंडीतील मातीचा वरचा थर पूर्णपणे कोरडा वाटल्याशिवाय झाडांना पाणी देऊ नका. जास्त ओलाव्यामुळे मुळे कुजतात.
कुंडीमध्ये पाणी साचत असेल, तर त्यात थोडी वाळू किंवा कोकोपीट मिसळा. यामुळे माती भुसभुशीत राहते आणि हवा खेळती राहिल्याने मुळांना बुरशी लागत नाही.
जी झाडे जास्त पाऊस सहन करू शकत नाहीत, त्यांना पावसापासून वाचवण्यासाठी छताखाली किंवा थोड्या आडोशाला हलवा. सततच्या पावसाने झाडांची पाने पिवळी पडू शकतात.
पावसाळ्यात झाडांना बुरशी लागण्याचे प्रमाण वाढते. यासाठी १५ दिवसांतून एकदा मातीत 'हळद' किंवा 'नीमखळी' मिसळा. हे उत्तम नैसर्गिक बुरशीनाशकाचे काम करते.
पावसाच्या अतिवृष्टीमुळे झाडांची वाढ वेगाने होते. हवा खेळती राहण्यासाठी आणि झाडांना योग्य आकार देण्यासाठी गरजेनुसार त्यांची हलकी छाटणी करा. यामुळे कीड लागण्याचा धोका कमी होतो.
कुंडीखाली ठेवलेल्या 'ट्रे'मध्ये पाणी साचू देऊ नका. हे पाणी लगेच काढून टाका, कारण साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि मुळांनाही इजा पोहोचते.