Akshata Chhatre
सतत झोप न लागणे, झोपेची वेळ चुकणे, किंवा रात्री वारंवार जाग येणे ही आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत खूपच सामान्य समस्या झाली आहे.
पण तीच सवय पुढे जाऊन मानसिक आणि शारीरिक आरोग्यास मोठा धोका ठरू शकते.
विशेषतः ताण, मोबाईलचा अतिवापर, चुकीची दिनचर्या, अनियमित आहार या सगळ्यामुळे झोपेचं नैसर्गिक चक्र बिघडतं आणि नंतर निद्रानाशाची सवय पक्की होते.
जायफळामध्ये myristicin नावाचं संयुग असतं, जे मेंदूत नैसर्गिकरित्या झोप नियंत्रण करणाऱ्या न्यूरोट्रांसमीटरवर सकारात्मक परिणाम करतं.
रात्री अपचन, गॅस, पोट फुगणं यामुळेही झोप लागत नाही. दूधात जायफळ मिसळून घेतल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो, पोटातील जळजळ कमी होते आणि शरीर झोपेसाठी तयार होतं.
अशा वेळी झोपेच्या आधी एक तास गरम दूधात अर्धा चमचा जायफळ पावडर मिसळून प्या. यामुळे शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होतात, आणि झोपेचा दर्जा आणि कालावधी सुधारतो.
नुसती झोप येणं पुरेसं नाही; ती सलग, सखोल आणि शांत असणं महत्त्वाचं आहे. जायफळयुक्त दूध झोपेत व्यत्यय येऊ देत नाही, शरीराला पूर्ण विश्रांती मिळते.