Attock Fort: मराठ्यांचा विजय पाकिस्तानातही; 'या' किल्ल्याच्या भिंती सांगतात इतिहास

Sameer Amunekar

मराठ्यांचा दरारा अटकेपर्यंत

मराठ्यांची सत्ता आणि पराक्रम आजच्या पाकिस्तानातील सिंधू नदीकाठी असलेल्या अटकेच्या किल्ल्यापर्यंत पोहोचला होता.

Attock Fort | Dainik Gomantak

१७५८ मधील विजय

थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पेशवे रघुनाथराव यांच्या मोहिमेदरम्यान मराठ्यांनी हा किल्ला जिंकला.

Attock Fort | Dainik Gomantak

‘अटकेपार झेंडे’ ही म्हण

या भव्य विजयामुळेच मराठ्यांच्या धाडसाची आणि विस्ताराची साक्ष देणारी ‘अटकेपार झेंडे’ ही ऐतिहासिक म्हण प्रचलित झाली.

Attock Fort | Dainik Gomantak

भौगोलिक महत्त्व

अटकेचा किल्ला सिंधू नदीच्या काठी, आजच्या पाकिस्तानमध्ये स्थित असून तो सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

Attock Fort | Dainik Gomantak

साम्राज्याचा विस्तार

या विजयामुळे मराठा साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचला आणि पराक्रमाचा सर्वोच्च मापदंड ठरला.

Attock Fort | Dainik Gomantak

वारसा

अटकेचा किल्ला सम्राट अकबराने इ.स. १५८३ मध्ये बांधला होता. पुढे तो अनेक शतकं सामरिक दृष्ट्या केंद्रबिंदू ठरला.

Attock Fort | Dainik Gomantak

इतिहासातील सुवर्णपान

अटकेवरील मराठ्यांचा विजय हा केवळ लष्करी यश नव्हता, तर मराठा साम्राज्याच्या गौरवगाथेत एक अभिमानास्पद सुवर्णपान ठरला.

Attock Fort | Dainik Gomantak

फिटनेससाठी नाहीत योग्य, 'ही' फळं वाढवतात पोटाची चरबी

Fruits | Dainik Gomantak
येथे क्लिक करा