Historical Fort: 'मनोहर-मनसंतोष' गड आजही दिमाखात, महाराजांनी महिन्याभरात केलं होतं मजबुतीकरण

Sameer Amunekar

मनोहर-मनसंतोष गड

मालवण, वेंगुर्ला, रेडी बंदरात उतरणारा माल आंबोली व हणमंत घाटमार्गे घाटमाथ्यावरील बाजारपेठांकडे जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी 'मनोहर-मनसंतोष' गड उभारण्यात आला.

Manohar Manasantosh fort | Dainik Gomantak

दिमाखात उभे

मनोहर-मनसंतोष गड हे दोन्ही किल्ले एकमेकांपासून खिंडीमुळे वेगळे झाले असून आजही त्यांचे पुरातन अवशेष दिमाखात उभे आहेत.

Manohar Manasantosh fort | Dainik Gomantak

महाराजांचा मुक्काम

या किल्ल्यांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे तब्बल एक महिना मुक्काम केला होता, जो स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो.

Manohar Manasantosh fort | Dainik Gomantak

नदीचा उगम

तारकर्ली–देवबाग येथे समुद्राला मिळणाऱ्या कर्ली नदीचा उगम याच किल्ल्यांच्या परिसरात होतो आणि ही नदी सुमारे ४८ किमी अंतर पार करून समुद्राला मिळते.

Manohar Manasantosh fort | Dainik Gomantak

प्राचीन अवशेष

मनोहर गडावर प्राचीन अवशेष असून तो चढण्यास सोपा आहे, तर मन्संतोष गड सुळक्यासारखा असून त्यावर जाण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते.

Manohar Manasantosh fort | Dainik Gomantak

पर्यटक

पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर पर्यटकांना या गडावर जाता येते, कारण हे किल्ले आंबोली घाट परिसरात आहेत.

Manohar Manasantosh fort | Dainik Gomantak

गडाची डागडूजी

आग्र्यातून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज १३ मे १६६७ रोजी मनोहर गडावर दाखल झाले व १५ जून १६६७ पर्यंत म्हणजेच ३४ दिवस येथे मुक्काम करून गडाची डागडूजी व फेररचना केल्याचे मानले जाते.

Manohar Manasantosh fort | Dainik Gomantak

'गरम' राहाल, तर 'निरोगी' राहाल!

Winter Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा