Manish Jadhav
विंध्य पर्वताच्या रांगांमध्ये वसलेल्या मांडू किल्ल्याला 'शादियाबाद' म्हणजेच आनंदाचे शहर म्हटले जायचे. हा किल्ला त्याच्या अप्रतिम वास्तुकला, नैसर्गिक सौंदर्य आणि तलावांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
हा किल्ला मालवाचा शेवटचा सुलतान बाझ बहादूर आणि त्यांची हिंदू राणी रुपमती यांच्या अमर प्रेमाचा साक्षीदार आहे. राणी रुपमतीने नर्मदा नदीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर खास 'रुपमती पॅव्हेलियन' बांधून घेतले होते.
किल्ल्याच्या सर्वात उंचावर असलेल्या या महालातून राणी रुपमती दररोज पवित्र नर्मदा नदीचे दर्शन घेत असत. सुलतान बाझ बहादूर यांनी आपल्या राणीच्या इच्छेखातर आणि प्रेमापोटी हा उंच महाल बांधला होता.
दोन कृत्रिम तलावांच्या (कापूर तलाव आणि मुंज तलाव) मध्ये बांधलेला हा महाल एखाद्या जहाजासारखा दिसतो. पावसाळ्यात जेव्हा हे तलाव पाण्याने भरतात, तेव्हा हा महाल पाण्यावर तरंगत असल्याचा भास होतो.
या महालाच्या भिंती 77 अंशाच्या कोनात झुकलेल्या असल्यामुळे याला 'हिंडोला' म्हणजेच झुलणारा महाल म्हणतात. या अद्वितीय वास्तुकलेचा वापर सुलतानाच्या दरबारातील मुख्य सभागृह म्हणून केला जात असे.
मांडू किल्ल्यात असलेली होशंग शाहची कबर ही भारतातील संपूर्ण संगमरवरात बांधलेली पहिली ऐतिहासिक वास्तू आहे. असे म्हटले जाते की, आग्रा येथील जगप्रसिद्ध 'ताजमहल' बांधण्यासाठी याच कबरीच्या वास्तुकलेतून प्रेरणा घेण्यात आली होती.
मांडू किल्ल्यावर परमार राजे, घोरी राजवंश आणि खिलजी सुलतानांनी वर्षानुवर्षे राज्य करुन अनेक स्मारके उभारली. या किल्ल्याचा भव्य 'दिल्ली दरवाजा' आणि 'जामा मशीद' आजही या सुवर्णकाळाची साक्ष देतात.