Malanggad Fort: अभेद्य गड, अजिंक्य मावळे! कल्याण-भिवंडी प्रांताचा वॉच टॉवर अन् शिवरायांच्या शौर्याचा प्रतिक 'मलंगगड'

Manish Jadhav

मलंगगड

छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी प्रांत जिंकल्यानंतर मलंगगडाचे महत्त्व ओळखले. कोकण किनारपट्टीवर नजर ठेवण्यासाठी आणि कल्याणच्या खाडीतून होणाऱ्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी या गडाचा वापर स्वराज्याच्या संरक्षणासाठी केला गेला.

Dainik Gomantak

मराठा साम्राज्याचा ताबा

महाराजांच्या काळात 1680 च्या सुमारास या किल्ल्यावर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण झाले. जंजिऱ्याच्या सिद्दीला शह देण्यासाठी आणि पोर्तुगीजांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी महाराजांनी या गडाची तटबंदी मजबूत केली होती.

Dainik Gomantak

मोक्याचे भौगोलिक स्थान

मलंगगड हा सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा वेगळा असलेला सुळका आहे. शिवरायांच्या युद्धनीतीनुसार, अशा दुर्गम आणि उंचावर असलेल्या किल्ल्यावरुन शत्रूच्या सैन्यावर लांबूनच लक्ष ठेवणे सोपे जात असे.

Dainik Gomantak

गडाची त्रिस्तरीय रचना

महाराजांच्या काळात गडाचे तीन भाग- पिराची माची, सोनमाची आणि बालेकिल्ला - लष्करीदृष्ट्या अत्यंत सुरक्षित करण्यात आले होते. शत्रूने खालच्या भागावर हल्ला केला तरी वरच्या बालेकिल्ल्यावरुन त्याला रोखणे शक्य होते.

Dainik Gomantak

रसद आणि पाणी साठवण

दुर्गराज महाराजांच्या आज्ञेनुसार गडावर खडकात खोदलेली पाण्याची टाकी आजही पाहायला मिळतात. युद्धाच्या काळात गडावरील सैन्याला पाणी आणि धान्याची कमतरता भासू नये, ही महाराजांची दूरदृष्टी गडावर स्पष्टपणे दिसते.

Dainik Gomantak

कठीण चढाई आणि गनिमी कावा

मलंगगडाचा बालेकिल्ला इतका सरळ आणि कठीण आहे की, मोजकेच मावळे संपूर्ण फौजेला रोखू शकत होते. महाराजांच्या 'गनिमी कावा' युद्धपद्धतीसाठी अशा नैसर्गिक तटबंदी असलेल्या किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते.

Dainik Gomantak

सांस्कृतिक आणि धार्मिक सलोखा

शिवरायांच्या स्वराज्यात सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांचा आदर केला जात असे. मलंगगडावरील श्री मलंग बाबांचा दर्गा आणि हिंदू श्रद्धास्थाने यांचा सन्मान राखून महाराजांनी लोककल्याणाचे आणि सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले होते.

Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

आणखी बघा