Bhuikot Fort: रणांगणात निजामाची दाणादाण उडवली.. 231 वर्षांपासून 'या' भुईकोट किल्ल्यावर घुमतोय मराठ्यांच्या विजयाचा 'सिंहनाद'

Manish Jadhav

खर्डा किल्ला

खर्डा किल्ला हा इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण याच ठिकाणी 1795 मध्ये झालेल्या युद्धात मराठ्यांनी हैदराबादच्या निजामाचा निर्णायक पराभव केला होता. मराठा साम्राज्याच्या एकजुटीचे हे शेवटचे मोठे युद्ध होते.

Kharda Fort | Dainik Gomantak

भुईकोट किल्ला

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेला हा किल्ला 'भुईकोट' प्रकारचा आहे. सभोवताली सपाट प्रदेश असूनही या किल्ल्याची रचना संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मजबूत करण्यात आली होती.

Kharda Fort | Dainik Gomantak

सवाई माधवराव पेशव्यांचे नेतृत्व

या युद्धाच्या वेळी सवाई माधवराव पेशवे गादीवर होते आणि नाना फडणवीस यांच्या मुत्सद्देगिरीमुळे सर्व मराठा सरदार (शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन) या मोहिमेसाठी एकत्र आले होते.

Kharda Fort | Dainik Gomantak

किल्ल्याची अभेद्य तटबंदी

खर्डा किल्ल्याला दुहेरी तटबंदी असून ती आजही सुस्थितीत आहे. किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदीवर असणाऱ्या जंग्या (बंदुकीसाठी छिद्रे) त्या काळातील प्रगत युद्धतंत्राची साक्ष देतात.

Kharda Fort | Dainik Gomantak

मुख्य प्रवेशद्वार आणि वास्तू

किल्ल्याला एक भव्य प्रवेशद्वार आहे. आत गेल्यावर आपल्याला सदर (कचेरी), पाण्याचे टाके आणि कोठारांचे अवशेष पाहायला मिळतात. निंबाळकर घराण्याने या किल्ल्याचे बांधकाम केल्याचे मानले जाते.

Kharda Fort | Dainik Gomantak

निजामाची शरणागती

खर्डाच्या युद्धात मराठ्यांच्या अफाट सैन्यापुढे निजामाचा निभाव लागला नाही. त्याला आपला जीव वाचवण्यासाठी मराठ्यांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागल्या आणि मोठा प्रदेश व दंड द्यावा लागला.

Kharda Fort | Dainik Gomantak

मराठा एकजुटीचे प्रतीक

पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांनी पुन्हा एकदा आपली शक्ती या किल्ल्याच्या निमित्ताने जगाला दाखवून दिली होती. सर्व मराठा सत्ताधीशांनी एकाच भगव्या ध्वजाखाली लढलेले हे शेवटचे युद्ध ठरले.

Kharda Fort | Dainik Gomantak

पर्यटकांसाठी ऐतिहासिक वारसा

आज हा किल्ला पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. किल्ल्याच्या बुरुजावरुन आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते. इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.

Kharda Fort | Dainik Gomantak

जामखेडच्या वैभवात भर

खर्डा गाव या किल्ल्यामुळेच ओळखले जाते. किल्ल्याच्या जवळील 'कानिफनाथ गड' देखील प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागातील हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्राच्या शौर्याची आठवण करुन देतो.

Kharda Fort | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

आणखी बघा