Lohagad Fort: विंचवाच्या नांगीसारखा आकार, आदिलशाहीकडून जिंकून स्वराज्याचं केंद्र बनलेला 'लोहगड'

Manish Jadhav

लोहगड

लोहगड हा पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मजबूत किल्ला आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासात या किल्ल्याला खास स्थान आहे.

Lohagad Fort | Dainik Gomantak

महत्त्वाचे केंद्र

1648 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. महाराजांनी लोहगडावर अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले आणि हा किल्ला त्यांच्या सुरुवातीच्या स्वराज्याच्या विस्तारात महत्त्वाचे केंद्र ठरला.

Lohagad Fort | Dainik Gomantak

पुरंदरच्या तहात गमावलेला गड

1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामुळे लोहगड मोगलांना (Aurangzeb) सोपवावा लागला होता. हा मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा आणि दुःखद टप्पा होता.

Lohagad Fort | Dainik Gomantak

महाराजांनी परत मिळवलेला किल्ला

चार वर्षांनी 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा मोगलांकडून जिंकून स्वराज्यात परत आणला. ही घटना महाराजांच्या धैर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे.

Lohagad Fort | Dainik Gomantak

नाना फडणवीसांचे निवासस्थान

मराठा साम्राज्याचे पेशवे आणि मुत्सद्दी नाना फडणवीस (Nana Fadnavis) यांनी याच किल्ल्यावर दीर्घकाळ निवास केला होता. त्यांनी लोहगड आणि विसापूर किल्ल्यावर मोठे बांधकाम केले. त्यांनी किल्ल्यावर तलाव आणि काही वास्तू बांधल्याची नोंद आहे.

Lohagad Fort | Dainik Gomantak

विंचूकाटा

लोहगडाची सर्वात मोठी ओळख म्हणजे किल्ल्याच्या पश्चिमेकडील टोक. या टोकाला 'विंचूकाटा' असे म्हणतात. या भागाचा आकार विंचवाच्या नांगीसारखा दिसतो. हा भाग टेहळणीसाठी आणि संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा होता.

Lohagad Fort | Dainik Gomantak

दर्जेदार स्थापत्यकला

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, ज्याला 'गणेश दरवाजा' म्हणतात, तेथील मजबूत बांधकाम आणि किल्ल्यावरील पाण्याची टाकी ही मराठाकालीन दर्जेदार स्थापत्यकलेची उदाहरणे आहेत.

Lohagad Fort | Dainik Gomantak

Aparajita Flower Benefits: तणाव आणि चिंता विसरा! 'अपराजिता' फुलं म्हणजे आयुर्वेदाची संजीवनी

Aparajita Flower Benefits | Dainik Gomantak
आणखी बघा