Sameer Panditrao
महाराजांनी स्वराज्यात फार बारकाईने विचार करून योग्य माणसांची निवड केली. क्षमता आणि गुणांवर आधारित व्यक्तींची निवड हे त्यांचे मुख्य धोरण होते.
शिवरायांनी रणनीती आणि नियोजनाला खूप महत्त्व दिले. लढाईचे योग्य नियोजन करून रणनीती आखणे यात त्यांचा हातखंडा होता.
महाराजांनी स्वराज्यात न्यायव्यवस्था कमालीची सुधारली, प्रजेला त्वरित योग्य न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला.
महाराजांनी राज्याची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली. त्यांनी शेतकऱ्यांना मदत करणारे कायदे केले आणि व्यापाराला प्रोत्साहन दिले.
महाराज कुशल प्रशासक होते. प्रत्येक निर्णयात, मोहिमेत ते विचारपूर्वक निर्णय घेत. सतत जनतेचा विचार करीत.
शक्तीचा, धाडसाचा उपयोग कधी करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. आग्र्यातील सुटका ही शौर्यगाथा यासाठी अभ्यासण्यासाठी आहे.
महाराज काळाच्या पुढचा विचार करत. त्यांची किल्लेबांधणी, सैन्य, आरमार याबाबतचे निर्णय याची साक्ष देतात.