Manish Jadhav
अलिबागच्या समुद्रात असलेला 'कुलाबा किल्ला' हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी बांधलेला एक अत्यंत महत्त्वाचा जलदुर्ग आहे. जंजिऱ्याच्या सिद्दीला शह देण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची निवड केली होती.
शिवाजी महाराजांनी 1662 मध्ये या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. स्वराज्याचे आरमार प्रबळ करण्यासाठी आणि समुद्रावर पकड मिळवण्यासाठी महाराजांनी या खडकाळ बेटाचे रुपांतर एका अभेद्य किल्ल्यात केले.
महाराजांनंतर हा किल्ला मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र बनला. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी याच किल्ल्यावरून इंग्रज, पोर्तुगीज आणि डच सत्तांना सळो की पळो करुन सोडले होते.
भरती-ओहोटीचे गणित ओळखून या किल्ल्याची तटबंदी बांधण्यात आली. समुद्राच्या लाटांचा थेट मारा होऊनही भिंती कोसळू नयेत, यासाठी विशेष कोनांनुसार दगडांची मांडणी केली.
कुलाबा किल्ला समुद्राच्या खऱ्या पाण्याने वेढलेला असूनही, किल्ल्याच्या आत गोड्या पाण्याचे तलाव आणि विहिरी आहेत. गडावरील सैन्यासाठी महाराजांनी केलेली ही पाण्याची व्यवस्था आजही थक्क करते.
किल्ल्याच्या आत राघोजी आंग्रे यांनी बांधलेले सुंदर गणेश मंदिर आहे. शिवकाळात आणि पेशवेकाळातही या गडावरील मंदिरांना आणि उत्सवांना मोठे महत्त्व होते.
आज कुलाबा किल्ला हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. किल्ल्याच्या बुरुजांवरुन समुद्र पाहताना शिवरायांनी उभारलेल्या त्या अफाट आरमाराच्या सामर्थ्याची प्रचिती प्रत्येक शिवभक्ताला येते.