Sameer Amunekar
पावसाळा म्हणजे निसर्गाचं लाजवंळ रूप, थोडंसे कुजबुजणारे ढग, झिम्माड पाऊस आणि हिरवाईचा साज.
पावसाळ्यात आपल्या जोडीदारासोबत कुठेतरी शांत, आल्हाददायक आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याची मजा काही औरच असते.
पावसाळ्यात सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांपैकी हे एक. हिरवागार परिसर, नयनरम्य धबधबे, डोंगरदऱ्या आणि ढगांत हरवलेलं वातावरण हे या दोन्ही ठिकाणांचं वैशिष्ट्य आहे.
कोकणातील आंबोली हे पावसाळ्यातल्या सहलीसाठी आदर्श ठिकाण आहे. धुक्याने भरलेले रस्ते, रस्त्याच्या कडेला वाहणारे लहान मोठे धबधबे आणि दाट जंगलं – प्रेमिकांसाठी स्वर्गासारखी अनुभूती देणारं असतं.
प्रत्येक पावसाळ्यात निसर्गप्रेमींना वेड लावणारा घाट म्हणजे माळशेज घाट. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा घाट धबधब्यांनी, हिरवाईने आणि ढगांच्या खेळाने भरलेला असतो.
जर तुम्हाला थोडं हटके आणि शांत ठिकाण हवं असेल, तर चिकमंगळूर तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कॉफीचे मळे, पावसाच्या सरी, धुके आणि थंडगार हवामान तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देतील.