Sameer Amunekar
मालवणमधील तारकर्ली आपल्या पारदर्शक पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात येथे स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगचा आनंद लुटता येतो. येथील 'हाऊस बोट' स्टे तुम्हाला स्वर्गीय अनुभव देईल.
रत्नागिरीतील हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटन अशा दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहे. मंदिराच्या अगदी जवळ असलेला स्वच्छ समुद्रकिनारा आणि तिथला सूर्यास्त मनाला भुरळ घालतो.
अथांग पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यालगत असलेल्या नारळ-पोफळीच्या बागा उन्हाळ्यात कमालीचा थंडावा देतात. शांतता हवी असणाऱ्या पर्यकांसाठी गुहागर हा उत्तम पर्याय आहे.
दापोली जवळील आंजर्ले बीच हा 'टर्टल फेस्टिवल'साठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला येथे कासवांची छोटी पिल्ले समुद्रात जाताना पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथील लांबच लांब पसरलेली चौपाटी आणि सुरुची झाडे उन्हाळ्याच्या दुपारीही गारवा टिकवून ठेवतात.
सिंधुदुर्गमधील हे एक 'हिडन जेम' आहे. एका बाजूला कर्ली नदीचा संगम आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. येथील शांतता आणि निळे पाणी पाहून तुम्ही परदेशातील बीच विसराल.
कोकणात उन्हाळ्यात जाताना सुती कपडे, सनग्लासेस आणि हॅट सोबत ठेवा. तसेच कोकणी मेजवानीत 'सोलकढी'चा आस्वाद घ्यायला विसरू नका, जी शरीराला नैसर्गिक थंडावा देते.