Sameer Amunekar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे पावसाळ्यात पर्यटकांचे आवडते ठिकाण मानले जाते.
पावसाळ्यात संपूर्ण घाट परिसर दाट धुक्याने झाकला जातो, ज्यामुळे प्रवास अधिक रोमांचक वाटतो.
मुसळधार पावसानंतर आंबोली धबधबा पूर्ण वेगाने कोसळताना पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.
घाटातील डोंगर, दऱ्या आणि जंगल परिसर पावसाळ्यात हिरव्यागार चादरीने नटलेला दिसतो.
आंबोलीतील सनसेट पॉइंटवरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना भुरळ घालते.
आंबोली परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि प्राणी आढळतात, त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खास आहे.
धबधबे, धुकं, थंडगार वातावरण आणि निसर्गसौंदर्यामुळे आंबोली घाटाचा प्रवास प्रत्येक पर्यटकासाठी संस्मरणीय ठरतो.