Sameer Amunekar
डोंगरांच्या कुशीत वसलेला सावंतवाडीतील मोती तलाव हिरवाईने वेढलेला असून मनाला शांतता देणारा आहे.
तलावाच्या काठावर सतत गार वारा वाहत असल्यामुळे हवामान नेहमीच सुखद असते.
जोडप्यांसाठी खासगी आणि शांत वेळ घालवण्यास हे ठिकाण उत्तम आहे.
तलावावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे रोमँटिक आणि मनमोहक वातावरण तयार होते.
तलाव, राजवाडा आणि निसर्ग असा परफेक्ट बॅकग्राऊंड मिळतो.
तलावात बोटिंगची सुविधा असल्यामुळे जोडप्यांसाठी खास रोमँटिक अनुभव मिळतो.
कोकणातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.