Sameer Amunekar
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मांडवी समुद्रकिनारा निसर्गाच्या अफाट सौंदर्यासाठी ओळखला जातो. शांत वातावरण मनाला प्रसन्न करते.
मांडवी समुद्रकिनाऱ्याची काळी वाळू हे येथील प्रमुख आकर्षण असून, ती इतर किनाऱ्यांपेक्षा वेगळी अनुभूती देते.
विस्तीर्ण समुद्र, निळे पाणी आणि सतत वाहणारा थंड वारा पर्यटकांना भुरळ घालतो.
मांडवी बीचवरून दिसणारा सूर्योदय व सूर्यास्त पाहणे हा अविस्मरणीय अनुभव ठरतो.
मांडवी समुद्रकिनाऱ्यावर विविध जलक्रीडा पाहता आणि प्रत्यक्ष अनुभवता येतात, त्यामुळे साहसी पर्यटकांसाठी हा खास आकर्षणबिंदू आहे.
शांतता आणि सुरक्षित वातावरणामुळे कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हा किनारा उत्तम आहे.
गर्दीपासून दूर, स्वच्छ परिसर आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे मांडवी समुद्रकिनारा निसर्गप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने स्वर्ग ठरतो.