Sameer Amunekar
मालवणचा किनारा स्वच्छ पांढऱ्या वाळूसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण.
मालवण बीचवर स्नॉर्केलिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राईड, जेट-स्की सारख्या रोमांचक उपक्रमांचा आनंद घेता येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हा येथील प्रमुख आकर्षण. समुद्रात वसलेल्या या किल्ल्याला बोटीतून जाता येते.
सोलकढी, कोकम करी, सुरमई आणि बॉम्बील फ्राय, ताजे सीफूड थाळी यांचा आस्वाद घेण्यासाठी मालवण पर्यटकांचे आवडते ठिकाण.
इतर प्रसिद्ध किनाऱ्यांच्या तुलनेत मालवण तुलनेने कमी गर्दीचा असून हिरवाई, स्वच्छ समुद्र आणि निवांत वातावरणासाठी उत्तम.
रस्त्याने तसेच रेल्वे व बस मार्गाने सहज पोहोचता येते मुंबईपासून अंदाजे 500 किमी अंतर असेल. जवळचे स्टेशन: कुडाळ/सावंतवाडी.
शांती, साहस, पर्यटन आणि स्वादिष्ट खाद्य पदार्थ सर्वकाही एकाच ठिकाणी मिळाल्याने सर्व वयोगटांसाठी आदर्श पर्यटनस्थळ.