Sameer Amunekar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आंबोली हे निसर्गसंपन्न आणि शांत डोंगराळ पर्यटनस्थळ आहे.
आंबोलीच्या विविध आकर्षणांपैकी 'कावळेसाद पॉईंट' हे ठिकाण पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरतं.
धुक्याच्या दुलईत लपलेलं, खोल दऱ्यांचं आणि धबधब्यांचं दर्शन घडवणारं हे ठिकाण म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच.
कावळेसाद पॉईंट हे आंबोली गावापासून सुमारे ८-१० किमी अंतरावर आहे.
कावळेसाद पॉईंटवरून दिसणारा सह्याद्रीचा प्रचंड विस्तार, खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य आणि पावसाळ्यात कोसळणारे धबधबे हे सारं पाहताना क्षणभर वाटतं की आपण जणू एखाद्या स्वर्गीय स्थळी आहोत.
इथल्या घनदाट जंगलामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, सतत वाहणारा गार वारा आणि दूरवरून येणारा धबधब्याचा आवाज हे अनुभव निसर्गाशी नातं जपणाऱ्यांना भारावून टाकतात.