Sameer Amunekar
दिवेआगार बीच आपल्या स्वच्छ, पांढऱ्या वाळू आणि नितळ निळ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. लाटांचा सौम्य आवाज आणि शांत वातावरण पर्यटकांना ताजेतवाने करतो.
हिरव्यागार नारळ-पोफळीच्या बागांनी आणि शांत वातावरणाने वेढलेले दिवेआगार हे कोकणातील सर्वात शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे.
मुंबईपासून सुमारे १७० किमी आणि पुण्यापासून १५७ किमी अंतरावर असल्याने दिवेआगार विकेंड ट्रिपसाठी आदर्श ठिकाण आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव समुद्र आणि पर्वत यांचा सुरेख संगम दाखवते – छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग!
दिवेआगार हे सुस्थितीत असलेल्या सुवर्णगणेश मंदिरासाठी (Suvarna Ganesh) प्रसिद्ध होते. आजही हे गाव धार्मिक व सांस्कृतिक वातावरणासाठी ओळखले जाते.
गर्दीपासून दूर, सुरक्षित आणि शांत किनारा असल्यामुळे कुटुंबांसोबत, कपल्स आणि सोलो ट्रॅव्हलर्ससाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
निसर्ग, इतिहास, स्थानिक कोकणी खाद्यपदार्थ आणि बीच लाईफ यांचा अनुभव घेण्यासाठी दिवेआगार हे उत्तम व किफायतशीर पर्यटन स्थळ आहे.