Sameer Amunekar
रणरणत्या उन्हाळ्यात जिथे महाराष्ट्र होरपळतोय, तिथे कोकणातील आंबोली मात्र धुक्याच्या चादरीत हरवलेलं पाहायला मिळतंय. इथलं थंडगार हवामान मनाला वेगळीच शांतता देतं.
समुद्रसपाटीपासून उंच असलेल्या या घाटात उन्हाळ्यातही तापमान अत्यंत कमी असते. येथील गारवा तुम्हाला एखाद्या हिल स्टेशनची आठवण करून देईल.
आंबोली घाटातील नागमोडी वळणे आणि दऱ्यांमधून वाहणारे पांढरेशुभ्र धुके हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. इथे उन्हाळ्यातही पावसाळ्याचा भास होतो.
आंबोली धबधबा जरी पावसाळ्यात हा धबधबा रौद्ररुप धारण करत असला, तरी उन्हाळ्यात येथील संथ वाहणारे पाणी आणि आजूबाजूची हिरवळ पर्यटकांना सुखावून जाते.
येथील 'कावळेसाद' पॉईंटवरून दिसणारी विस्तीर्ण दरी आणि ढगांची दाटी पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. फोटोग्राफीसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
निसर्गासोबतच अध्यात्माची जोड हवी असेल, तर हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानी असलेल्या प्राचीन शिवालयाला नक्की भेट द्या. येथील कुंड आणि गुंफा खूप शांत आहेत
जर तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत कमी गर्दीच्या आणि शांत ठिकाणी जायचे असेल, तर आंबोली हा उत्तम पर्याय आहे. इथलं 'मिनी महाबळेश्वर' तुम्हाला पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडेल!