Sameer Amunekar
कोकणात शांत, सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा अनुभवायचा असेल तर मालवण तालुक्यातील आचरा समुद्रकिनारा एक उत्तम पर्याय आहे.
कमी पर्यटक, स्वच्छ परिसर आणि पांढऱ्या शुभ्र वाळूचा हा किनारा एकांत शोधणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे.
येथे कोणत्याही प्रकारच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज किंवा बोट राईड उपलब्ध नसल्याने गर्दी फारच कमी असते.
किनाऱ्यावर विविध प्रकारचे शंख, शिंपले मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, जे पर्यटकांना खास आकर्षित करतात.
आचरा समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला नितांत शांतता आणि निवांतपणा अनुभवायला मिळतो.
आचऱ्याच्या बाजूलाच खाडी आणि समुद्र यांच्या संगमामुळे तयार झालेले जामदुल बेट हे येथील खास वैशिष्ट्य आहे.
जामदुल बेटाकडे जाण्यासाठी पूल बांधलेला असून, आजूबाजूला उंचच उंच नारळाची झाडे आणि हिरवागार परिसर मन प्रसन्न करून टाकतो.