Sameer Amunekar
आरे आणि वारे असे दोन सुंदर समुद्रकिनारे एका डोंगररांगेने विभागलेले आहेत. एका ठिकाणी उभं राहून दोन समुद्रकिनारे पाहण्याचा अनुभव फारच दुर्मीळ आहे.
स्वच्छ, पारदर्शक समुद्र आणि पांढुरकी वाळू पाहिली की खरंच मालदीव आठवतो. फोटो काढायला हे ठिकाण परफेक्ट आहे.
इथे गर्दी कमी असल्यामुळे शांत, प्रदूषणमुक्त वातावरण मिळतं. शहराच्या गोंगाटापासून दूर रिलॅक्स व्हायला उत्तम जागा.
आरेवारे बीचवरील सूर्यास्त म्हणजे डोळ्यांचं पारणं. आकाशात पसरलेले केशरी-गुलाबी रंग मन शांत करून टाकतात.
डोंगर, समुद्र, नारळाची झाडं आणि निळं आकाश प्रत्येक फ्रेम इन्स्टाग्राम-रेडी वाटते.
अजूनही फारसा व्यावसायिक स्पर्श न झाल्यामुळे बीच स्वच्छ आणि नैसर्गिक स्वरूपात जपलेला आहे.
रत्नागिरी शहराजवळ असल्याने एक दिवस किंवा वीकेंड ट्रिपसाठी आरेवारे बीच परफेक्ट ठिकाण ठरतो.