Kolaba Fort: छत्रपतींच्या आरमाराचं केंद्र...! मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास सांगणारा 'कुलाबा किल्ला'

Manish Jadhav

कुलाबा किल्ला

कुलाबा किल्ला हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरात आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारासाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून निवडला होता.

Kolaba Fort | Dainik Gomantak

17व्या शतकात उभारणी

शिवाजी महाराजांनी 1680 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरु केले. किल्ल्याची रणनीती आणि स्थान अतिशय महत्त्वाचे होते. या ठिकाणाहूनच अरबी समुद्रातील हालचालींवर नियंत्रण ठेवता येत होते.

Kolaba Fort | Dainik Gomantak

समुद्राच्या मध्यभागी किल्ला

हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असून भरती-ओहोटीच्या वेळी किनाऱ्यापासून वेगळा होतो. भरतीच्या वेळी किल्ल्याकडे जाणे कठीण होते, तर ओहोटीच्या वेळी पायी चालत जाता येते.

Kolaba Fort | Dainik Gomantak

सरदार कानोजी आंग्रे

महाराजांच्या निधनानंतर या किल्ल्याची जबाबदारी त्यांच्या आरमाराचे प्रमुख सरदार कानोजी आंग्रे (Sardar Kanoji Angre) यांच्याकडे होती. त्यांनी ब्रिटिशांना आणि पोर्तुगीजांना अनेक वेळा तोंड दिले.

Kolaba Fort | Dainik Gomantak

किल्ल्याची मजबूती

कुलाबा किल्ल्याच्या मजबूत तटबंदीमुळे आणि 30 फुटांपर्यंतच्या उंच भिंतींमुळे तो शत्रूंसाठी अभेद्य होता. या किल्ल्यात गोड्या पाण्याचे तलाव आजही आहेत, जे त्या काळातील स्थापत्यशास्त्र दर्शवतात.

Kolaba Fort | Dainik Gomantak

ऐतिहासिक अवशेष

किल्ल्याच्या आतमध्ये काही मंदिरे आणि ऐतिहासिक इमारतींचे अवशेष आजही दिसतात. यात सिद्धिविनायक मंदिर आणि हनुमान मंदिर प्रमुख आहेत.

Kolaba Fort | Dainik Gomantak

बांधकाम पूर्ण

शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली असली, तरी त्यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे बांधकाम पूर्ण केले.

Kolaba Fort | Dainik Gomantak

आरमाराचे केंद्र

हा किल्ला केवळ एक संरक्षणात्मक किल्ला नव्हता, तर मराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता. येथूनच अरबी समुद्रातील व्यापारावर नियंत्रण ठेवले जात होते.

Kolaba Fort | Dainik Gomantak

IND vs ENG: केएल राहुल ठरला विराटपेक्षा सरस! अशी कामगिरी करणारा बनला तिसरा भारतीय

आणखी बघा