Manish Jadhav
दापोली तालुक्यातील निसर्गरम्य केळशी गाव शांत आणि पर्यटकांच्या गजबजाटापासून दूर आहे.
केळशीमध्ये सुमारे 350-400 वर्ष जुना हजरत याकूब बाबा यांचा दर्गा आहे. शिवाजी महाराजांनी या दर्ग्याच्या बांधकामासाठी मदत केली होती, असे मानले जाते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे हे एक उत्तम प्रतीक आहे.
हे मंदिर पेशवेकालीन असून अत्यंत शांत आणि पवित्र आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती आणि परिसरातील कोरीव काम पाहण्यासारखे आहे. दरवर्षी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
केळशीतील किनाऱ्याजवळ निसर्गाचा एक चमत्कार पाहायला मिळतो, तो म्हणजे वाळूची प्रचंड मोठी टेकडी. कित्येक वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीमुळे ही टेकडी तयार झाली असावी, असे भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात.
केळशीमध्ये तुम्हाला अस्सल कोकणी पाहुणचार अनुभवायला मिळतो. ताजी मासळी, सोलकढी, उकडीचे मोदक आणि कोकणी मेव्याचा आस्वाद घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
केळशी हे गाव निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी एक पर्वणी ठरते.
केळशी गावात फिरताना तिथली पारंपारिक कौलारु घरे आणि वाड्या पाहायला मिळतात. गावाची शांतता आणि प्रदूषणमुक्त वातावरण मनाला खूप सुखद गारवा देते.
केळशीला भेट दिल्यानंतर तुम्ही जवळच असलेले आंजर्ले (कड्यावरचा गणपती), हर्णे बंदर आणि मुरुडचा किनारा यांसारख्या ठिकाणांनाही सहज भेट देऊ शकता.