Sameer Amunekar
१००० वर्षांपूर्वीपासून जपानमध्ये त्वचेच्या सौंदर्यासाठी 'तांदळाच्या पाण्या'चा (Rice Water) वापर केला जातो. हे नैसर्गिक सौंदर्य जपण्याचे सर्वात जुने आणि प्रभावी गुपित आहे.
तांदूळ शिजवल्यानंतर किंवा भिजवल्यानंतर उरलेल्या पाण्यात जीवनसत्त्वे, फायबर, मॅग्नेशियम आणि मँगनीजसारखी पोषक तत्त्वे असतात, जी त्वचेचे पेशीस्तरावर पोषण करतात.
तांदळाचे पाणी एक नैसर्गिक 'स्किन क्लिनझर' म्हणून काम करते. हे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करून त्वचेची रंध्रे नैसर्गिकरित्या आकुंचन पावण्यास मदत करते.
तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी१, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. हे घटक त्वचेवरील सुरकुत्या आणि 'एजिंग'ची लक्षणे कमी करून तुम्हाला चिरतरुण ठेवण्यास मदत करतात.
संशोधनानुसार, तांदळाचे पाणी एक्झिमामुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते. हे त्वचेवरील जिद्दी डाग हलके करून त्वचा सुधारण्यास अत्यंत प्रभावी आहे.
तांदळाचे पाणी दिवसातून दोनदा त्वचेवर लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. हे त्वचेला ओलावा देऊन तिला मऊ आणि नितळ बनवते.
तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवा किंवा तांदूळ शिजवून गाळून घेतलेले पाणी थंड करा. हे पाणी कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा.