Manish Jadhav
जैसलमेर किल्ल्याची स्थापना इ.स. 1156 मध्ये भाटी राजपूत शासक रावळ जैसल यांनी केली होती. त्यांच्याच नावावरुन या शहराला आणि किल्ल्याला 'जैसलमेर' हे नाव मिळाले.
हा किल्ला पिवळ्या रंगाच्या वाळूच्या खडकापासून बनवला आहे. जेव्हा सूर्यकिरणे या किल्ल्यावर पडतात, तेव्हा तो सोन्यासारखा चमकतो, म्हणूनच याला 'सोनार किल्ला' किंवा 'गोल्डन फोर्ट' म्हणतात.
जैसलमेर किल्ला थार वाळवंटाच्या मध्यभागी असलेल्या 'त्रिकुट' नावाच्या टेकडीवर बांधला गेला. जमिनीपासून उंच असल्यामुळे शत्रूंवर पाळत ठेवणे इतिहासकाळात खूप सोपे होते.
हा जगातील अत्यंत दुर्मिळ आणि एकमेव असा 'लिव्हिंग फोर्ट' आहे. याचा अर्थ असा की, इतिहासकाळापासून आजतागायत या किल्ल्याच्या आत शहराची 4000 हून अधिक लोकसंख्या, बाजारपेठा आणि घरे थाटलेली आहेत.
या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या बांधकामात कुठेही सिमेंट, चुना किंवा मातीचा वापर केलेला नाही. केवळ दगडात दगड एकमेकांमध्ये अचूकपणे गुंफून हा महाकाय किल्ला उभा केला.
या किल्ल्याने इतिहासात अनेक मोठी युद्धे अनुभवली आहेत. अलाउद्दीन खिलजी आणि फिरोजशाह तुघलक यांच्या आक्रमणादरम्यान किल्ल्यावरील राजपूत स्त्रियांनी आपल्या स्वाभिमानासाठी 'जौहर' केले होते.
या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, संस्कृती आणि वास्तुशिल्प लक्षात घेऊन 2013 मध्ये युनेस्कोने जैसलमेर किल्ल्याला 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केले.