Health Tips: केळी खाल्ल्यावर लगेच पाणी पिताय? थांबा! आरोग्यासाठी लय घातक

Manish Jadhav

केळी

केळं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, पण केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही, याबद्दल अनेकदा गैरसमज आहेत. चला तर मग याविषयी जाणून घेऊया...

Banana | Dainik Gomantak

पचनक्रियेवर परिणाम

केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. केळ्यामध्ये स्टार्च आणि नैसर्गिक शर्करा असते. पाणी प्यायल्याने हे पदार्थ विरघळतात आणि पचन प्रक्रिया मंदावते.

Banana | Dainik Gomantak

पोटदुखी आणि गॅसची समस्या

केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने काही लोकांना पोटात गॅस होणे, पोट फुगणे किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. पचन व्यवस्थित न झाल्यामुळे ही समस्या उद्भवते.

Banana | Dainik Gomantak

कफ आणि सर्दीचा धोका

आयुर्वेदानुसार, केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास शरीरात कफ वाढू शकतो, ज्यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

Banana | Dainik Gomantak

शरीरातील पाण्याचे संतुलन

केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे, केळं खाल्ल्यानंतर लगेच पाण्याची तीव्र गरज नसते. शरीराला पुरेसे पाणी मिळत असल्याने लगेच जास्त पाणी पिणे अनावश्यक ठरु शकते.

Banana | Dainik Gomantak

केव्हा पाणी प्यावे?

केळं खाल्ल्यानंतर साधारणपणे 20 ते 30 मिनिटांनी पाणी पिणे सुरक्षित मानले जाते. या वेळेत केळ्याचे अर्धवट पचन झालेले असते.

Banana | Dainik Gomantak

थोड्या प्रमाणात पाणी

जर तुम्हाला केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची तीव्र इच्छा झालीच, तर थोड्या प्रमाणात कोमट पाणी पिणे हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. थंड पाणी पिणे टाळावे.

Banana | Dainik Gomantak

ऍसिडिटीचा धोका

काही तज्ञांच्या मते, केळं खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटातील ऍसिड पातळ होते, ज्यामुळे पचन मंदावते आणि ऍसिडिटीचा (आम्लपित्त) त्रास वाढू शकतो.

Banana | Dainik Gomantak

Tanaji Malusare: महाराजांचा निष्ठावान सवंगडी अन् स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारा 'तानाजी'; वाचा सिंहगडची गाथा!

आणखी बघा